Your Notifications are Empty.

    Browse our plans and add your selections to get started.

    Explore now Sign in

    वैध पॉलिसीशिवाय वाहन चालविल्यास बाईक इन्श्युरन्स दंड

    • Motor Blog

    • 02 फेब्रुवारी 2021

    • view-icon

      66 Viewed

    Contents

    • 2019 चा मोटर वाहन कायदा
    • दंड व शिक्षा
    • निष्कर्ष
    Bike Insurance Fine

    भारतात वैध वाहन इन्श्युरन्स हा अनिवार्य डॉक्युमेंट्सचा भाग आहे. जो मोटरबाईक रायडरकडे असणे आवश्यक आहे. सरकारी धोरणे स्पष्टपणे सांगतात की वाहन इन्श्युरन्सशिवाय वाहन चालवणे मोटर व्हेईकल ॲक्ट, 2019 नुसार बेकायदेशीर आहे. त्यानंतरही, भारतातील रस्त्यावर जवळपास 57% वाहने इन्श्युअर्ड नाहीत. 2017-18 मध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार, हा आकडा 21.11 कोटींवर पोहोचला आहे. इन्श्युरन्स नसलेल्या वाहनांपैकी 60% वाहने टू-व्हीलर आहेत. जो भारतातील सर्वाधिक लोकप्रिय वाहन प्रकार मानला जातो. बाईक इन्श्युरन्स हा भारतातील सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय आहे. भारतात इन्श्युअर्ड नसलेल्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. नियमांचे उल्लंघन करण्याच्या स्थितीत रायडर्स कडून बाईक इन्श्युरन्स दंडाचा भुर्दंड सहन करावा लागतो. या लेखातून तुम्ही टू-व्हीलर साठी इन्श्युरन्स असण्याचे महत्व आणि नसल्यास होणारे परिणाम जाणून घेऊ शकता.

    2019 चा मोटर वाहन कायदा

    वैध वाहन इन्श्युरन्सशिवाय टू-व्हीलर चालवणे या कायद्यान्वये बेकायदेशीर ठरविण्यात आले आहे. जर व्यक्ती अशाप्रकारे आढळून आल्यास शिक्षा व दंडाची देखील तरतूद आहे. मोटर वाहन संबंधित वाढत्या मृत्यू संख्येला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे. 2019 मध्ये, रस्त्यावरील अपघातांमुळे भारतात 1,49,000 पेक्षा जास्त मृत्यू झाल्याचे अहवालातून दिसून आलं आहे. यावरुन अत्यंत स्पष्ट आहे की रस्त्यावरील सुरक्षा नागरिकांसाठी एक चिंताजनक समस्या आहे आणि कठोर धोरणे हाती घेण्याची आवश्यकता यामधून दिसून येते. त्यामुळेच कायद्यांचे उल्लंघन केल्यास दंडासह सरकारने थर्ड-पार्टी लायबिलिटी इन्श्युरन्स मँडेट देखील लागू केले आहे. या मँडेटनुसार अपघाताच्या बाबतीत थर्ड पार्टीला झालेल्या नुकसानीसाठी ड्रायव्हरला इन्श्युअर्ड केले जाईल.

    दंड व शिक्षा

    बाईक इन्श्युरन्स पॉलिसीचे पालन न केल्यास तुमच्यावर दंडात्मक शुल्क आकारले जाऊ शकते.

    बाईक इन्श्युरन्स दंड

    अलीकडेच मागील ₹ 1000 दंडाच्या रकमेत वाढ करुन दंडाची रक्कम ₹ 2000 वर पोहोचली आहे. काही लागू प्रकरणांमध्ये 3 महिन्यांच्या कारावासाची देखील तरतुद आहे.

    नो क्लेम बोनस

    नो क्लेम बोनस किंवा बाईक इन्श्युरन्समध्ये एनसीबी सक्रिय असताना तुमच्या पॉलिसीचा क्लेम करण्याची संधी तुम्हाला न मिळाल्यास त्याबाबतीत तुम्हाला मिळणारे लाभ आहे. जर तुम्ही 90 दिवस किंवा अधिक दिवसांसाठी वैध बाईक इन्श्युरन्सशिवाय पकडले गेल्यास तुमचा एनसीबी रद्द होईल.

    कायदेशीर दायित्व

    अशा परिस्थितीत जिथे तुम्ही इन्श्युरन्स नसलेले वाहन चालवताना अपघातात सापडल्यास तुमच्यासाठी केवळ गुन्ह्यातील शिक्षेची तरतूद (निष्काळजीपणा) असणार नाही तर थर्ड पार्टीला झालेले नुकसान भरण्यासाठी देखील जबाबदार असेल. तुमच्यासाठी दुहेरी संकट असेल.

    तुम्ही बाईक इन्श्युरन्सशिवाय आढळून आल्यास काय होईल?

    वाहन इन्श्युरन्सशी संबंधित ट्रॅफिक नियमांचे उल्लंघन करण्यासाठी ट्रॅफिक पोलिस अधिकाऱ्याकडून तुम्हाला पुढील परिस्थितीला सामोरे जावे लागेल. तुम्हाला तुमच्या वाहनाशी संबंधित सर्व कायदेशीर डॉक्युमेंट्स सादर करण्यास सांगितले जाईल. यामध्ये तुमचे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (आरसी), पोल्यूशन सर्टिफिकेट आणि सर्वात महत्वाचे इन्श्युरन्स पॉलिसी यांचा समावेश होतो. तुम्हाला तपासणी अधिकाऱ्याला सर्व डॉक्युमेंट्स सादर करावे लागतील. जर तुमच्याकडे डॉक्युमेंट्स नसल्यास तुम्ही बाईक इन्श्युरन्स दंडासाठी पात्र असाल. डॉक्युमेंट्स अनुपलब्ध असल्याच्या स्थितीनुसार तुमच्याकडून दंड आकारला जाईल. विभिन्न डॉक्युमेंट्सच्या संदर्भाने भिन्न दंड आकारला जातो. चलन पेपरच्या स्वरूपात तुम्हाला दंड जारी केला जाईल. ज्याद्वारे तुम्हाला दंड भरावा लागेल. तसेच ऑनलाईन पेमेंट पर्याय देखील उपलब्ध आहेत. बहुतांश प्रकरणांमध्ये, चलन हे राज्य विभागाच्या ई-चलन वेबसाईटद्वारे देय केले जाऊ शकते. ऑफलाईन पेमेंटसाठी, नजीकच्या ट्रॅफिक विभाग कार्यालयाला भेट देऊन ते केले जाऊ शकते. टू-व्हीलर इन्श्युरन्स दंड टाळण्यासाठी टिप्स

    • तुमच्याकडे असलेल्या सर्व टू-व्हीलर वाहनांसाठी तुमच्याकडे बाईक इन्श्युरन्स असल्याची खात्री करा.
    • इन्श्युरन्सची डिजिटल आणि सॉफ्ट कॉपी तयार करण्याची खात्री करा. सॉफ्ट कॉपी वाहनामध्ये आणि तुमच्या मोबाईल फोनवर डिजिटल कॉपी तयार ठेवा.
    • तपासणी करा टू-व्हीलर इन्श्युरन्स रिन्यूवल कालावधी तपासाल आणि वेळेवर रिन्यू होत असल्याची निश्चितपणे सुनिश्चिती कराल.
    • थर्ड पार्टी लायबिलिटी इन्श्युरन्स प्राप्त करण्याचे निर्धारित करा. कारण सध्या तो अनिवार्य आहे.

    निष्कर्ष

    भारतातील ट्रॅफिक परिस्थिती आणि वैयक्तिक रस्ता सुरक्षा मार्गदर्शक तत्वे यातून सूचित होते की सर्व वाहन धारकांनी वैध बाईक इन्श्युरन्स सोबत बाळगणे आवश्यक आहे. हे एकप्रकारे नैतिक दायित्व आहे आणि भारतातील रस्ते सुरक्षेच्या विषयी निर्माण केलेले कायदेशीर दायित्व आहे. नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी नवीनतम पॉलिसींच्या अनुरुप वर्तन करा. मिळविण्याची खात्री करा समर्पक टू-व्हीलर इन्श्युरन्स तसेच.

    Go Digital

    Download Bajaj General App!

    godigi-bg-img